आजचे सुभाषित

एके काळी जमीन, सोने, गाय , धान्य ह्याला संपत्ती समजले जायचे. आज काल ज्ञान हीच संपत्ती बनले आहे.

अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति ।
व्ययतो बुद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात् ॥

आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवले होते कि ज्ञान हा एक असा अद्भुत कोश आहे, कि ज्यातून आपण जिती खर्च करू तितकाच तो वाढत जातो.

ज्ञान निर्माण करायचे असेल तरी सर्वांना मुक्त हस्ताने ज्ञान उधळण्याची सोय असली पाहिजे व ज्ञानाचे हे कोश ज्याला लुटायचे असतील त्याले लुटायची मुभा असली पहिजे.

अमेरिके सारख्या देशांत उच्च शिक्षण हे पूर्णतः सरकारी नियमा पासून मुक्त आहे. कुणीही आपले विद्यापीठ उघडू शकतो व आपल्या पदवी प्रदान करू शकतो. आर्थिक नफ्या साठी विद्यापीठ चालविणे अमेरिकेत पूर्णतः कायदे समंत आहे. त्याच वेळी प्राथमिक आणि माध्यमिक क्षेत्रात अमेरिकन सरकारची लुडबुड फारच आहे. परिणाम स्वरूप अमेरिकन उच्च शिक्षण आज सहज पणे फार चांगल्या दर्जाचे आहे, व त्याच वेळी प्राथमिक आणि माधामिक क्षेत्रांत अमेरिकन शाळा जगाच्या फार मागे आहेत. भारतीय शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणात असल्याने भारतीय शिक्षण सर्वच क्षेत्रांत दुय्यम दर्जाचे बनले आहे.

ज्ञानाचा कोश भरतोय सरकारने पिंजर्यात बंद करून ठेवल्याने सर्वांचेच नुकसान होत आहे.

भारतीय अर्थतज्ञ श्री अरविंद पनगरिया खालील मुलाखती भारतीय शिक्षण व्यवस्थे विषयी बोलत आहेत. आपले सरकार त्यांचे ऐकिल एवढी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या