रवी जाधव यांचा ‘बालक-पालक' हा मराठी सिनेमा सध्या गाजतोय. सिनेमात धाडसी आणि नवा विषय असूनही पारंपरिक शालीनता जपण्यात आली आहे. एकही अभद्र संकेत या सिनेमातत दिसत नाही. ‘विकी डोनर’मध्ये जी ऊर्जा आणि शैली दिसली तीच या सिनेमात दिसली. गंभीर समस्येला विनोदाचे आवरण घालून सादर करण्यात आले आहे. सेंसॉरचे प्रमाणपत्र मिळाल्याने मुले आई-वडिलांसोबत हा सिनेमा एकत्र पाहू शकतात. यातील शाळेत जाणारा मुलगा एका वयस्क सिनेमाची डीव्हीडी पाहतो, त्याचे वडील ते पाहतात आणि त्याला बेदम मारतात. त्याची पत्नी त्याला शांततेने समजवण्याचा सल्ला देते. भूतकाळात तोही अशाच एका अनुभवातून गेला आहे, याची आठवण करून देते.
फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येते की, एका चाळीतील चार मुले चिंतेत असतात की त्यांच्याच चाळीमधील त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलीकडून काहीतरी चूक झाली आहे आणि चाळीतील सर्व लोक तिच्यावर नाराज आहेत. तथापि त्यांना लाजही वाटत आहे. त्या मुलीला जणू काही जगण्याची इच्छा नसते. या चार मुलांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना मारण्याची धमकी दिली जाते. त्या मुलीसोबत काय झाले होते हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यापेक्षा थोडा मोठा मुलगा त्यांना एक सिनेमा पाहण्याचे सांगतो. तो मुलगा त्या चार मुलांना डीव्हीडीवर एक अश्लील सिनेमा दाखवतो. त्यानंतर त्यातील दोन मुले विचित्र वागतात आणि मुलींकडे वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांच्या दोन मैत्रिणी त्यांच्यापासून दूर जातात. एक समजदार माणूस या चार मित्रांमध्ये आलेल्या भिंतीला पाडू पाहतो. तो माणूस सगळी माहिती मिळवून चौघांच्या आई-वडिलांसोबत मुलांना सेक्सचे सत्य सांगतो.
आठवणीतून बाहेर निघून वडील आपल्या शाळेत जाणार्या मुलाला समजून सांगतात. त्याच्या विकसित होणार्या मेंदूतून हा नाजूक विषय ते काढून टाकतात. अभ्यासक्रमात जीवनाच्या एका महत्त्वाच्या भागाचे वैज्ञानिक शिक्षणात महत्त्व आहे. या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते. या नाजूक विषयांवर विदेशात अनेक सिनेमे बनलेले आहेत. मात्र भारतात ‘बालक-पालक’ पहिला सिनेमा आहे. तंत्रज्ञानाच्या काळात मुलांसाठी खूप काही उपलब्ध आहे म्हणून त्यांच्या बिघडण्याची भीती असते. तंत्रज्ञानाशी लढता येत नाही, तर त्याचा विचारात समावेश करून जगता येते. बालपण आवाज न करत किशोर वयात प्रवेश करतो आणि युवावस्था पापण्या लवेपर्यंत दरवाजावर उभी असते. या नाजूक विषयावर ‘समर ऑफ 42’ उत्तम सिनेमा आहे. ‘ग्रॅज्युएट’सुद्धा चर्चेत होता. आणखी एक विदेशी सिनेमा होता, त्यात एका तरुणीचा पती युद्धावरून परत येत नाही. त्यामुळे गावातील सर्व लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. एका किशोरवयीन मुलाचा तिला आधार मिळतो. त्या मुलालाही गर्व वाटू लागतो. त्याचवेळी तिचा सैनिक पती परत येतो.
राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मधील ऋषी कपूर आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठय़ा शिक्षिकेवर प्रेम करू लागतो. ती शिक्षिका आपल्या प्रियकरासोबत लग्न करते. अल्पवयीन नायक शिक्षिकेला कपडे बदलताना पाहतो आणि ते चित्र त्याच्या डोक्यात फिरत असते. तो कन्फेशन खोलीत जातो. परतल्यावर शिक्षिका त्याला म्हणते की, लहान मुले कधीच पाप करत नाहीत तेव्हा मुलगा तिला म्हणतो की, मी आता लहान राहिलो नाही. शिक्षिकेच्या प्रियकराला पहिल्याच नजरेत त्या अल्पवयीन मुलाची मन:स्थिती कळते. तो प्रेमी मुलाला मित्र बनवतो. प्रेम आणि अल्पवयीन वयाच्या आकर्षणाविषयी मुलाला समजून सांगतो. त्या भेटीनंतर मुलगा कुंठेतून मुक्त होतो.
पहिला भाग संपूर्ण सिनेमाप्रमाणे प्रदर्शित करावा म्हणजे ही अजरामर कृती ठरेल. असा सल्ला सिनेमा बनत असताना सत्यजित रे यांनी राज कपूर यांना दिला होता. खरं तर लहानपणी आणि अल्पवयीन वयात मनात जिज्ञासा असते. आपल्या शरीरात होणार्या बदलाबरोबरच मानसिक स्तरावर बदलाला समजण्यास ते असर्मथ असतात. आयुष्याच्या याच वळणावर कुंठेचा जन्म होतो. त्यामुळे संपूर्ण आयुष्य काळोखात जाते. सेक्स संबंधित गोष्टीची माहिती नसल्यामुळे हिंसक गोष्टी घडत असतात. हिंसेची अनेक कारणे आहेत. मात्र सेक्स आणि धर्मांधता मूळ कारण आहे. या काळात वयस्कर लोकांचा स्पष्टपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्ण जीवनाला प्रकाशमान करू शकतो. शिक्षण तज्ज्ञ आणि समाजशास्त्रींनी या क्षेत्रात पुढाकार घ्यायला हवा.
सौजन्य : दिव्य मराठी
1 टिप्पण्या
SAHMAT DADA
उत्तर द्याहटवा